संसाराचा गाडा पुढे ढकलण्याचा नादात हिने अखेरचा श्वास घेतला, परंतु हिचा नवरा अजून….

 नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. तर चला कथेला सुरवात करू रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करून सई झोपण्यासाठी बेडरूममध्ये आली.. रात्रीचे 12.15 झाले होते. मोबाईल हातात घेऊन दिवस भरचे मेसेज सरकवत राहिली. बाजूला समीर म्हणजेच सईचा नवरा मोबाईल घेऊन बसला होता. सई- “समीर उद्या सकाळी मला लवकर ऑफिसला जायच आहे,तर प्लीज मला सोडणार का स्टेशन ला..” समीर- “नाही हा सई माझी उद्या सुट्टी आहे.

तर मी उद्या उशीरा उठणार आहे.. तु जा ना रिक्षा ने.. मला आराम करायचा आहे.” सई- “अरे पण सकाळी लवकर कुणी नसत, मला भीती वाटते एकटीला रिक्षा मध्ये. तु आलास तर बर होईल”. समीर- (जोरात ओरडून)” एकदा सांगून समजत नाही का तुला? माझा उद्या Week off आहे मला माझी झोप मोड करायची नाही.” आणि हो एवढीच भीती वाटते तर सोडून दे नोकरी आणि बस घरी. किती पगार मिळतो ते माहित आहे.. सई- गप्पच… मोबाईल मध्ये 4.00 चा गजर लावून झोपी गेली.. सकाळ झाली गजर च्या आवाजात सुद्धा समीर भडकला.. सई काहीही न बोलता गजर बंद करून उठली. घरातील कचरा काढला.

फरशी पुसली. आंघोळ करून देवपूजा केली व किचनमधे गेली, सकाळच्या नाश्त्यासाठी कांदेपोहे, दुपारचे जेवण ( आमटी,भात, भाजी,पोळी)करून स्वतःचा डबा भरला..मगाशी दुध आणायला गेली होती तेव्हा गॅस वरची पोळी करपली होती. तिच करपलेली पोळी डब्यात टाकली. आणि डबा पर्स मध्ये ठेवला. घड्याळाच्याा काटया कडे पाहत भराभर आवरत ती एक एक काम उरकत होती. आता 6 वाजले होते. 5 मिनिटांत तिला आवरायचे होते.. बरोबर 6.05 मिनिटांनी तिने घर सोडले. घरापासून दूर चालत गेली तरीसुद्धा रिक्षा चा पत्ता नव्हता.. सारखे मागे पुढे पाहत ती चालत होती. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.. मनात.

भीती वाटत होती पण नोकरी सोडून जमणार नव्हते. ती तशीच चालत स्टेशनला पोहोचली. व ट्रेन पकडली. गर्दीत पुढे सरकत होती.. बसायला जागा नाही.. झोप सुद्धा येत होती.. प्रवास एक तासाचा होता.थोड्या वेळानं तिला एका महिलेने थोडी बसायला जागा दिली. ती लगेच बसली.. तेवढाच काय तो आराम…. समीर कमवता होता.. घरात माणसे मात्र चार.. सई, समीर, समीर चे आई,वडील. सई गावाकडची होती पण स्वभाव बोलका असल्यामुळे मुंबई सारख्या मोठ्या शहरात पटकन रुजली.. कामाच्या ठिकाणी ओळखीची माणसं झाली होती. लग्नानंतर मुंबईत आली व लगेच एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली. पगार तसा कमी.

होता परंतु घरात बसून राहण्यापेक्षा कुठेतरी नोकरी करावी. हीच तीची इच्छा होती. नोकरी करण्यापूर्वी सासूबाई ने घरातील सर्व कामे उरकून जावे लागेल हे स्पष्टच सांगितले. सई ने सुद्धा हो म्हणून कामाला जाऊ लागली. दररोज ची धावपळ सुरूच होती. त्यात घरात कुणाचा Support नव्हता. तरीसुद्धा तिन संसाराच रहाटगाडगे सुरळीत चालू ठेवल होत. विचार करता करता ट्रेन विरार ला पोहोचली.उशीर झाला होता.तिच्या मनात विचार येत होते. आज जर उशीर झाला तर नोकरी जाईल. ती घाईने कशीबशी वाट काढत डब्यातून उतरणार इतक्यात तिचा तोल गेला व ती डब्यातून खाली पडली. लगेच आजूबाजूला गर्दी झाली.

तिनं तिथेच तिचा जीव सोडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती, एकीकडे तिच्या पर्स मधून पडलेला करपलेली पोळी चा डबा सांडला होता.. तिच्या ओळखपत्र मध्ये तिचा पत्ता पोलिसांनी मिळाला. त्यांनी तिच्या घरी फोन केला. समीर चा फोन silent होता. तो झोपला होता कारण त्याला सुट्टी होती. सासूबाई ची सुद्धा सकाळ झाली नव्हती. सार घर झोपले होते. सई माञ रक्ताच्या थारोळ्यात बेवारस अवस्थेत पडली होती. सार काही संपल होत. रात्री पासून सकाळपर्यंतची धावपळ आता थांबली होती.ती आता शांतपणे तिरडीवर निजली होती…. मित्रांनो तुम्हाला या स्त्री बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Comments