लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा पतीने पत्नीला तिच्या चारित्र्य विषयी प्रश्न विचारला.. तेव्हा पहा पुढे काय घडले

तिला तिच्या उतरत्या वयाची जाणीव करून देत असत, आणि मग सुरू होत असे आठवणींचा जीवघेणा प्रवास…. एखाद्या चित्रफितीप्रमाणे मेंदूच्या स्मृतिपटलावरून एक एक दृश्य पुढे पुढे सरकत जावी त्याप्रमाणे एक एक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळून जात असे. आईविना सरलेलं बालपण.., तारुण्य.., लग्न.., नवरा.., मुले.., व आतापर्यंतचा तिचा प्रवास.., काढलेल्या खस्ता सारं सार काही, पुन्हा नव्याने परिस्थिती आणि जबाबदाऱ्या माणसाला लहान वयातच प्रौढ बनवतात. सुधाचही असंच काहीस झालं. लहान वयातच आई गेल्यामुळे तिच्या संसाराची आणि लहान भावांची जबाबदारी सुधावर येऊन पडली.

त्यामुळे बालपणापासून ते तरुणपणाचा काळ कसा सरला हे तीच तिला देखिल कळलं नाही. ऐन तरुण्यातले फुलपाखराप्रमाणे बागडणारे दिवस कसे आणि कधी उडून गेले पत्ताच लागला नाही. वडीलांची आर्थिक परिस्थिती गरीब होती, त्यामुळे आहे त्यात समाधान मानून गुजराण करायची सवय होती तिला.. कधी कसले हट्ट नाही, कोड कौतुक नाही, इतर मुलींसारखं लाडे लाडे बोलायची सवय नाही, कोणी लाड करावे प्रेम करावे अशी अपेक्षा देखील नाही. त्यामुळे ती स्वतःही उमलत्या वयात कोणावर प्रेम करू शकली नाही. तिला कोणी आवडायच नाही असेदेखील म्हणता येणार नाही, आई गेल्यावर चाळी सारख्या ठिकाणी.

लोकांच्या घाणेरड्या नजरा सांभाळून तिने स्वतःला जपलं होत, हे बाहेरच जग वाईट आहे, इथे मुले मुलींना पळवून नेऊन फसवतात, त्यात आपल्याला आई नाही, वडील साधे भोळे गरीब त्यामुळे कोणी फसवलं तर..?, असा विचार करून कधी कोणाच्या प्रेमात वगैरे पडायचं नाही असा निर्णय घेऊन तिनेच स्वतःवर बंधने लादून ठेवली होती. त्यानंतर रीतसर लग्न करून, नवरा मुले, नोकरी यातच तिने स्वतःला झोकून दिल होत. आणि आता या उतरत्या वयात तिला जाणीव होत होती की घर, दार, मुले, आपलं सगळं व्यवस्थित असून सुदधा काहीतरी कमी आहे, खुप काही निसटून गेलंय, कसलं हे अपूर्णत्व…. सगळ्यांनी.

आपला फक्त वापरच करून घेतला की काय? कोणीच आपल्यावर कधी प्रेम नाही केलं, आपण मात्र सगळ्यांसाठी राबत राहिलो. लोक म्हणतात ते खरंच आहे की, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते, तिला समज आल्यापासून ती कधी भाऊ, बहीण, आई, वडील, तर कधी नवरा, मुले, सासू-सासरे यांची आई बनून जाते…. तिच्यातलं सार सार मातृत्व, प्रेम ती आपल्या माणसांवर बरसवत राहाते. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात तिची आई व पती या दोन व्याक्तिकडूनच प्रेमाच्या अपेक्षा असतात. ते जर तिला नाही मिळालं तर सर्व असूनही ती आतून एकटी असते. सुधालाही आता अशीच काहीशी.

जाणीव होत होती. ‘पुष्कर’ सुधाचा पती…. एक शिक्षित, निर्व्यसनी, मेहनती, जबाबदार पुरुष , दिवसरात्र कष्ट करून, त्याने आणि सुधाने मुलांसाठी त्यांच्या परीने खुप काही केलं होतं, करत होते, सगळंच तर छान चालू होतं . पण तरीही सुधाला त्यांच्या नात्यात एक अंतर जाणवत होत. त्यांच्या आवडीनिवडी, विचार, स्वभाव, सगळंच अगदी भिन्न होतं. पुष्कर काळजी तर व्यवस्थीत घेत होता, घरासाठी, मुलांसाठी सगळं करत होता, मग अस काय होत जे सुधाला खटकत होत. खरं तर या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडेही नव्हतं. आज लग्नाला पंचवीस वर्ष होऊन सुद्धा सुधाला पुष्करच्या नजरेत, स्पर्शात कधी प्रेम.

आपलेपणा, हळुवारपणा भासला नव्हता. त्याच्या स्पर्श तिला नेहमीच कृत्रिम जाणवायचा. अगदी लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या मनात सं भो गा बद्दल भीती निर्माण झाली होती, त्याला कारणही तसच होत, अगदी दहा वर्षाची असताना तिच्या आजोळी जाताना तिने आईला शेवटची मिठी मारली होती, त्यानंतर तिची आई तिला न भेटताच देवाघरी गेली. तीच लग्न झाल्यावर प्रथमच इतक्या वर्षांनी तिला एका परपुरुषाचा स्पर्श होणार होता. लहानपणी आईने वि व स्त्र पाहिल्यावर आज तिचा पती तिला पाहणार होता. हनिमून बद्दल मैत्रिणीं कडून ऐकलं तेवढच माहीत होत, पण प्रत्यक्षात सगळं वेगळच घडलं.

पुष्करचा आततायीपणा, आक्रमक वागणं, लाज, संकोच, भीती यामुळे ती पुष्करला सहयोग नाही देऊ शकली, तो जवळ आल्यावर तीचा चेहराच घाबरून पां ढ रा पडायचा, भीतीने तीच शरीर ताठ व्हायचं, ती त्याला जवळ येऊ देत नव्हती, आणि मग तो चिडून दूर निघून जायचा, त्याच्या तापट स्वभावामुळे तो तिला समजून घेऊ शकत नव्हता. त्याने तिला भलतेच प्रश्न विचारले , तुझ्यावर ब ला त्का -र झाला होता का?, कोणी तुझा गै र फा य दा घेतला होता का?, तिला वाटू लागले तिच्यातच दोष आहे, कदाचित तिलाच इतर मुलींसारखं वागता येत नाही, पण हळू हळू कालांतराने, जेंव्हा त्यांचा प्रथम सं भो ग झाला तेंव्हा त्याचा.

गैरसमज आपोआप दूर झाला, त्याला कळून चुकल, की अस काहीही नाही, हळू हळू सगळ सवयीचं होऊन गेलं, मुले झाली, मुले थोडी मोठी झाली, सुधा आणि पुष्करच्या जबाबदाऱ्या वाढल्या कामे वाढली आणि दुरावा सुद्धा.. मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Comments