जेव्हा पत्नीच्या मित्राबद्दल पातीला कळते तेव्हा पती तिच्या सोबत असे वागतो की, जाणून तुम्हाला धक्काच बसेल.

 सकाळी सगळे कामावर निघून गेल्यावर. ऋता ने पोह्याची डिश पुढे घेतली. खरं तर गार पोहे तिला अजिबात आवडत नव्हते. पण आज खूपच घाई झाली. पट्टकन खायला जमलेच नाही. खूपचं उलटसुलट काम करावे लागले आज. स्वतःशीच म्हणाली, माझचं मेलीच चुकलं. माहित होत घरात भाज्या नाही, पण कंटाळा केला. त्याची शिक्षा पण भोगायलाच पाहिजे नं. घरात थोड्या थोड्या भाज्या होत्या.

त्यात एकाला एक आवडते तर, दुसऱ्याला दुसरीच. मग काय घातला तीन भाज्यांचा घाट. डबा पाहून आज प्रत्येक जण मात्र सुखावणार हे नक्की. प्रत्येकाच्या आवडीची भाजी डब्यात ! तरी हे म्हणाले ऋता अग नको देऊस आजच्या दिवस डबा , निदान मला तरी. खाईन मी बाहेर. नाही तर असं कर, तू मला फक्त पोळ्या बांधून दे. भाजी घेईन मी कॅन्टीग मधून. काही नको अहो करते पटपट. मग म्हणाले तू भाजी टाकते फोडणीला तोवर मी तुला पोहे भरवतो . एक घास तू , एक घास मी. तुझे दोन्ही काम होतील. तसेही गार पोहे तुला आवडत नाही ना..! काहीतरीच काय हो तुमचं ? थोडी लाज ! शरम…! पोरं मोठी झाली आपली.

अन तुम्हाला भारी काय काय सुचते ? अग त्यात काय आली लाज शरम.? उलट आपलं प्रेम पाहून पोरं बायकोवर जास्त प्रेम करतील.! या बाबतीत पोरं माझ्यावर गेलेली चालतील हं मला ! ऋता स्वतःशीच हसली .खरचं खूप प्रेम करतात विनय. खूप विनयशील माणूस.! पण तेवढेच शीघ्रकोपी. तंत्रितच गार पोहे संपवले. एकीकडे चहा गॅसवर ठेऊन. पेपर वाचायला घेतला. तेवढ्यात झाडांना पाणी घालायला बकुळा आली. तिला चहा वाढवायला सांगून पेपर वाचत बसले. तितक्यात फोन ची रींग वाजली. बकुळेनेच फोन उचलला. अर्थात मीच म्हणाले, बकुळा जरा फोन उचल गं! निवांत पेपर सुद्धा वाचायला मिळत नाही बाई ! काय.

हि फोन ची कटकट ? बकुळेने फोन उचलला. फोन माझी मैत्रीण नीता चा होता. लगेच माझ्या हवाली कॉडलेस देऊन ती चहा आणायला गेली. नीता म्हणाली, ऋता अग मार्केट ला जाऊयात का. ? का गं काही विशेष ? हो गं नणंद बाई येणार आहे. म्हंटल छानशी साडी आणावी. नवरात्री पण आहेच. घरच्या या माहेरवाशीणला साडी घेऊ म्हंटल. नेहमी गडबडीत पैसेच देतो गं आम्ही तिला. ती कायम म्हणते, वहिनी एखादयावेळी साडीच दे गं ! आईबाबा गेले तेव्हा पासून साडी घेतलीच नाही , माहेरची साडी… वरून म्हणाली, तसे तू पैसे देतेस त्याची साडीच घेते गं मी प्रत्येक वेळी . पण का कोणास ठाऊक तिला माहेरच्या साडीची सर नाही.

बरं का वहिनी ! आणि ती हे खूप मनातून बोलते गं ! ह्यांना आईवडील नाही. दोघा बहीण भावांचा खूप जीव आहे एकमेकांवर आणि माझी पण लाडकीच आहे ती. मलाही बहीण नाही. बहिणी बहिणी सारख्याच राहतो आम्ही. पाहते न तू. विचार केला घेऊनच ठेवावी एखादी साडी . दोनचार दिवस वेळ पण आहे. ठिक आहे नीता . खरतर मला पण मार्केटला जायचेच होते. का ग ? तुझी पण नणंद येते की काय? नाही गं! आणि माझी नणंद! अगदी भावना शून्य तिला उलट पैसे घ्यायला आवडतात .आपल्या आवडीने पाहिजे तशी घेता येते साडी.. दोन वर्षांपूर्वी मी दिवाळीला साडी घेऊन ठेवली तिला . तर म्हणते कशी. वहिनी अगं.

काय हे? निदान साडी घेतांना मला विचारायचे तरी ना ? हा colour आहे गं माझ्याकडे! त्यापेक्षा तू मला पैसेच देत जा… बरं ते जाऊ दे, अगं मला आज भाजीला जायचे होते. कालपासून घरात एक भाजी नाही. आज जायलाच पाहिजे. सकाळीच सांगून झालं माझं मलाच. ऋताबाई आज भाजीला जायचे बरं का ? नीता हसायला लागली. चहा घेऊन पेपर बाजूला सारला. पटापट काम उरकून निघालो. साडी आणि भाजीच्या शॉपिंगला. आधी साडी च्या दुकानात गेलो. नेहमीचाच ओळखीचा दुकानदार. छान साडया दाखवल्या. नीताने दोन साडया घेतल्या. एक तिला , एक नंदेला . तिथून मोर्चा भाजीकडे वळवला.

भाजी मार्केट मध्ये भाजी घेत असताना. एक चेहरा ओळखीचा वाटला. तोही भाजीच घेत होता. त्याने smile दिले. पक्की ओळख नाही पटली . पण का कोण जाणे मी त्याला कुठेतरी पहिले असे सारखे वाटतं होते. मी ही त्याला smile दिली आणि दोघे एकदम बोललो. तू ऋता न! तुम्ही श्रीकांत न! हो ! हो! दोघेही एकदमच बोललो. मी म्हणाले, अहो पण तुम्ही इथे कसे. म्हणाला मी ट्रान्स्फर होऊन आत्ताच आलो. अजून जॉईन सुद्धा नाही झालो. सामानाची लावालाव चालू आहे. दोन दिवस बाहेरच जेवलो. आजपासून घरी सुरुवात करायची आहे. बायकोला तेवढीच मदत. म्हणून हे दिव्य काम करतोय. मग तोच म्हणाला चल कॉफी घेऊ.

मी म्हणाले नाही हो . घरी जायला हवं आणि आपल्या गप्पांमुळे माझी ही मैत्रीण नीता कंटाळून जाईल. मग तो अदबीने तिला म्हणाला … ताई खूप दिवसाने मैत्रीण भेटली. प्लीज चला नं थोडी कॉफी घेऊ. आम्ही जवळच्याच हॉटेल मध्ये कॉफी प्यायला बसलो. कॉलेज चे मित्र मैत्रिणी असलो तरी मी सुरवातीला खूप अदबीने त्याच्याशी बोलत होते. मग तोच म्हणाला, काय गं ? मी केव्हापासून बघतो . मी तुला अग, का ग संबोधतो आणि तू मात्र मला काकाजी बनवून टाकले. सारखे अहो जाहो करते. त्याच्या बरोबर आम्ही दोघी हसायला लागलो. मग तो कॉलेज च्या एकेक आठवणी सांगू लागला. बोलता बोलता.

म्हणाला खरं सांगू ऋता. मला तू खूप आवडायची. पण तुझ्या मनाचा थांग कधी लागलाच नाही. मग मीच बाजूला झालो. पण बरं झालं हं खूप समझदार बायको मिळाली मला. ये तुझा नवरा कसा आहे ग? माझा नवरा पण खूप चांगला आहे. विनय त्याचं नाव, नावाप्रमाणेच. गप्पा मारून , कॉफी पिऊन आम्ही निघालो. त्याने हातात हात घेऊन चल बाय म्हणून पुन्हा भेटीचे आश्वासन देऊन निघणार तोच त्याच्या लक्षात आलं , म्हणाला ऋता अग मोबाईल नंबर तरी दे ! मग एकमेकांच्या नंबर ची देवाण घेवाण झाली आणि घरी आलो. आता रोज सकाळी तो good morning चे मेसेज पाठवू लागला. मीही पाठवू लागले.

नेहमी मेसेज मध्ये डिअर किंवा डिअर friend असंच लिहायचा. रविवारी सकाळीच हे बाहेर दाढी करायला गेले. रस्त्यात सुहास भेटला. सुहासने श्रीकांत बद्दल यांना काय सांगितले कोणास ठाऊक. हे लगेच घरी आले. जरा चिडूनच होते. मला हाक मारली, ऋता ! ये ऋता ! इकडे ये! मी ओळखलं पारा चढला. आपण शांत राहिलेलं बरं. मला यांचा स्वभाव चांगला माहित आहे. कुठलाही सारासार विचार न करता पटकन ताडताड बोलत सुटतात.त्त्यावेळी आपण शांत बसायचे. शांत झाल्यावर जर त्याला त्याची चूक पटवून दिली तर लगेच सॉरी पण म्हणतात. मुलं नेहमी म्हणतात. आई कशी राहिली गं तू या माणसा बरोबर.

किती बोलतात राग आला तर ? मी त्यांना नेहमी म्हणते . अरे तुम्ही नाण्याची एकच बाजू पहिली . दुसरी मलाच माहित. तुम्ही पाहिले नं, तुम्हाला साधी चापट सुद्धा कधी मारली नाही. आज पुन्हा असंच काहीतरी झाले असावे. ऋता बाहेर आली . विचारले अहो काय झाले ? का इतका आरडा ओरडा करताय ? तू आठ दिवसापूर्वी कुठे आणि कोणाबरोबर बाहेर गेली होती. ऋता ला कळलेच नाही विनय काय बोलतात. शेवटी न राहवून ती हळूच बोलले. अहो मला समजेल असं बोला . उगाच कोड्यात बोलू नका. मग म्हणाले, कोणत्या मित्रांसोबत फिरत असते गं माझ्या माघारी ? म्हणाले तुझा मोबाईल दाखव. ती काहीच.

बोलली नाही, मोबाईल तिथेच होता , हातात दिला. तिच्या मोबाईलला लॉक कधीच नसते. लगेच व्हाट्सअप्प उघडून मेसेज पाहिले. श्रीकांत चे मेसेज वाचले. अच्छा म्हणजे हा तो तुझा डिअर ! माझ्या माघारी हे सगळं चालते तर ! तरीही ती शांतच. बडबड करून तो सुद्धा शांत झाला. ऋताने जेवण बनवले . रागातच झोपले होते. जेवायला उठवले , बोलले मला नाही जेवायचे ! पोट भरलं माझं! खूप विश्वास घात केला माझा तू ! ऋता प्रेमाने म्हणाली, विश्वास घात मी केला , तर मला शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही का भोगता ? चला जेवून घ्या ! तसेही तुम्हाला उपाशी असले की चक्कर येते नं ! उठा बर ! शपथ आहे तुम्हाला.

माझी आणि मुलांची . आपलं ठरलं न, काही झालं तरी जेवणावर राग काढायचा नाही. मग उठले , गुपचूप जेवण केले. पुन्हा हॉल मध्ये जाऊन बसले.ऋता मागच आवरून विनय जवळ जाऊन बसली. आता राग थोडा निवळला होता. तिने हातात हात घेतला. म्हणाले काय झाले.? कोणी काही सांगितले , बोलले का तुम्हाला ? मग ते म्हणाले , नीताच्या नवऱ्याने सुहासला सांगितले. सुहासने आज मला सांगितले. पण काय सांगितले ? मला तरी कळू द्या ? मग त्यानीं सुहासने सांगितलेले वाक्य न वाक्य सांगितले. कोणताही नवरा हे एकूण संतापणारच. पण तिला माहित होत. नीता आणि भाऊजी इतक्या खालच्या पातळीवर.

कधी जाऊच शकत नाही. तिने नीताला फोन केला. नीता जेवण झाले का ग.? झाले असेल तर भाऊजींना घेऊन icecream खायला ये ! दहा मिनिटात दोघेही आले. घरात icecreem होतेच. बोलता बोलता श्रीकांत चा विषय काढला. नीता आणि भाऊजी खूप चांगले बोलत होते त्याच्या बद्दल आणि बोलता बोलता हेही म्हणाले. मी सुहासला पण बोललो हे. त्याच काय झालं विनय . अरे त्याला त्याची कॉलेज ची मैत्रीण भेटली फेसबुक वर खूप वर्षाने. सांगत होता. तर मीही सांगितले , अरे आपली ऋता वहिनीला आहे न तिला पण तिचा कॉलेजचा मित्र भेटला. आठ दिवसापूर्वी, याच गावात तेही अचानक . बदली झाली म्हणे त्याची इथे.

भाजी घेतांना मार्केट मध्ये भेट झाली. भाऊजी इतकेच बोललात तुम्ही सुहास ला ! हो वाहिनी! का काय झालं ? नाही हो खरचं काही नाही ? हे आज जेवतांना म्हणाले, आपण तुझ्या कॉलेज friend … श्रीकांतला बोलऊया का जेवायला फॅमिली सहित ? मग मी म्हणाले श्रीकांत ला नंतर बोलयू. त्या आधी दिनेश भाऊजींना आणि नीताला icecreem खायला बोलावते. खूप दिवसात तुम्ही दोघे आलाच नाही. म्हणून आज मुद्दाम icecreem खायला बोलवले. icecreem खाऊन दोघेही जायला निघाले. बरं ऋता म्हणून दोघे निघून गेले. मुलं बाजूच्या बेडरूम मधून सगळं ऐकतच होते. मग ऋता ने पुन्हा त्याचा हात हातात घेतला. म्हणाले.

सुहास कसा आहे हे तुम्हाला मी सांगायला हवं का ? कुणाचेही चांगले डोळ्यात सलणारा हा माणूस. आपले किती प्रेम आहे एकमेकांवर चांगले ठाऊक आहे त्याला . मागे पण तुमच्या बद्दल काय काय सांगून माझे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला.मी भीक घातली नाही तर , आता तुम्हाला पकडलं आणि खोटनाट सांगून तुमचे मन कलुषित केले आणि तुम्ही विश्वास ठेवला? काय बोलू मी! मग स्वतःच म्हणाले. खरंय गं ! मी हे तर साफ विसरूनच गेलो होतो. खरं सांगू का आधी माझा विश्वास बसलाच नाही . पण मी घरी येऊन तुझा मोबाईल चेक केला. त्यातले ते श्रीकांतचे सारखे ते डिअर , डिअर मग माझा तोल गेला आणि.

तुला वाट्टेल ते बोललो. मग ऋता म्हणाली खरतर माझं हि चुकलंच हो. मी सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे होते श्रीकांत बद्दल. पण पहिल्यांदाच भेटला इतकं लक्षात नाही राहील. तुम्ही ऑफिसला सगळे गेल्यावर मोबाईल बघते. त्याचा मेसेज असतो good morning चा. मी सुद्धा रिप्लाय द्यायचा म्हणून देते. मुद्दाम असं काहीच नाही. मुख्य म्हणजे तुम्ही माझ्या बद्दल असा विचार करणार. हे स्वप्नात पण नाही वाटलं हो ! आता मला सांगा तुम्ही ऑफिस मध्ये जाता. घरी आल्यावर किती तरी लोकांशी बोलतांना एस डिअर! नो डिअर ! असं बोलतांना तुम्हाला माझ्या कानाने ऐकलं. मी नाही कधी विचारलं हि डिअर कोण?.

कधीच तुमचा मोबाईल चेक नाही केला…कारण… कारण…माझा विश्वास आहे. माझा नवरा असं काही करूच शकत नाही. माझा नवरा माझ्याशी कधीच प्रतारणा करणार नाही. तुम्ही मात्र विश्वास नाही ठेवला. आता मला सांगा. काय शिक्षा करायची तुम्हाला ? उठून उभे राहिले. लोटांगण घालत म्हणाले, चुकलं ग ! खरंच माफ कर ! ती म्हणाली, अहो मी नेहमीच माफ करत आले हो. पण मला वाईट या गोष्टीच वाटत. इतके प्रेमळ तुम्ही. एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीचा कोणताही सारासार विचार न करता राई चा पर्वत करता. खूप त्रास होतो . बदला थोडा स्वभाव. खरंच ग चुकतेच माझं ! एक मात्र खरं ! त्यावेळी तू शांत असतेस.

कदाचित म्हणूनच मला अधीकच आवडते. अलगद ओठावर ओठ ठेवले. दोन्ही बाहुत, घट्ट मिठीत सामावून घेतले. देहभान विसरून चुंबनाचा वर्षाव होत राहिला. दोन्ही बाजूने. डिअर चा घोळ आणि त्यामुळे झालेला संताप ओसरून, त्याची जागा आता प्रेमाने घेतली होती. विनय फक्त सॉरी डिअर ! सॉरी डिअर ! इतकचं म्हणत होता. दोन्ही मुले बाहेर येऊन टाळ्या वाजवत होते. ऋता लाजून, अलगत विनयच्या मिठीतुन सुटण्याची धडपड करत होती. मित्रांनो तुम्हाला हिच्या बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

Comments